Avoid Copy Paste

Friday, April 29, 2011

|| नाती ||

नाती फुलांसारखी असतात. त्यांना उमलू द्यावं लागतं. पाणी बदलावं लागतं. उन दाखवावं लागतं. Basically लक्ष द्यावं लागतं. आपोआप उमलणारी गोष्ट नाही ती.
त्यांना pause , resume , नाही करता येत सोयीनुसार. काळ हा मोठा factor आहे नात्यात. बऱ्याच काळ काहीही खतपाणी न घातलेले नाते आताही तसच कसं राहील? "बिघडण्यासारखे काहीही घडले का?" हा विचार करण्यापेक्षा "जिवंत राहण्यासाठी काही केले का?" हा विचार करणे जास्त बरोबर नाही का? अगदीच खूप काही करायची गरज नसते, पण जेवढी असते तेवढी essential असते. एकदा का पाकळ्या कोमजू लागल्या कि फारसं काही करता येत नाही. लक्ष न देता उमलायची, सुगंधायची अपेक्षा करणे चूक नाही का ?